ओम नमः शिवाय! हिंदू पंचांगानुसार होळी, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. दोन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी धूलिवंदन अर्थात होळी खेळली जाते. होळीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरीविष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा केली जाते. होळीची रात्र ही विशेष मानली जाते, कारण या दिवशी पौर्णिमा असते.
वर्षभरामध्ये काही विशेष तिथी असतात त्या मधील एक दिवस म्हणजे होळीचा दिवस. मित्रांनो या वर्षी 28 मार्च रविवार रोजी होळीचा सण आला आहे. पौर्णिमा तिथीचा आरंभ होत आहे. 27 मार्च शनिवार रोजी रात्री 3:27 वाजता पौर्णिमेससर्वात होत आहे आणि पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे रविवार 28 मार्च रोजी रात्री 12:18 वाजता. यादिवशी होलीका प्रदिपण म्हणजेच होळी पेटवली जाते.
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकटे जळून राख व्हावीत, आणि आपल्या जीवनात आनंदी आनंद यावा, यासाठी या विशिष्ट तिथीला अनेक उपाय केले जातात. त्याचबरोबर काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केले जातात. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपण काही छोटे-छोटे उपाय करू शकतो. यामुळे माता लक्ष्मी चा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आणि माता लक्ष्मी चे स्थान आपल्या घरामध्ये राहील.
मित्रांनो असे म्हटले जाते की माता लक्ष्मी ही चंचल आहे. म्हणजे एकाच ठिकाणी ती जास्त दिवस राहत नाही. जर आपल्याला असे वाटत असेल की माता लक्ष्मीने आपल्या घरातून कधीच जाऊ नये, म्हणजेच आपल्या घरामध्ये धन, पैसा कधीच कमी पडू नये तर, माता लक्ष्मीला आपल्या घरांमध्ये थांबून ठेवण्यासाठी एक विशेष उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो होळी प्रज्वलित केल्यानंतर पोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर होळीला जल अर्पण करत प्रदक्षिणा घेतल्या जातात.
तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाच, सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता. आणि हे सर्व झाल्यानंतर म्हणजेच होळीची पूजा करून झाल्यानंतर , नैवेद्य अर्पण करून आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे. उपाय अगदी सोपा आहे. यासाठी तुम्हाला दोन लवंग, दोन विड्याची पाने, आणि थोडेसे देशी गाईचे तूप लागणार आहे. आपल्याला या दोन्ही लवंगा देशी गायीच्या तुपामध्ये बुडवून विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत. यासाठी आपल्याला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत. आणि त्यावर या तुपात बुडवलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत.
होळी प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये हे विड्याचे पान लवंगा सहित आपल्याला टाकायचे आहे. आणि त्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती मनातल्यामनात बोलून देवाला प्रार्थना करायची आहे की, माझी ही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल तर होळीमध्ये नारळ अर्पण करायचा आहे. असे केल्याने कुटुंबीयांमध्ये प्रेम वाढते, घरामध्ये सुख-समृद्धी आणि शांती येते.
जर तुम्हाला नोकरी संबंधी काही समस्या असतील तर काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन आपल्याला हे होळीमध्ये अर्पण करायचे आहेत. पण हा उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे. म्हणजे सर्वांच्या नकळत तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
जर तुम्हाला नोकरी मध्ये प्रमोशन हवं असेल किंवा उद्योगधंद्यामध्ये बरकत हवी असेल; खूप कष्ट करूनही तुम्हाला योग्य तो फायदा होत नसेल, उद्योगधंद्यांमध्ये वाढ होत नसेल किंवा हवा तसा नफा मिळत नसेल तर, हा उपाय तुम्ही अवश्य करा. यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात सफलता मिळेल. अशाच प्रकारच्या आणि काही समस्या असतील तर त्यामधून मुक्ती मिळवण्यासाठी होळीच्या विशेष तिथीला वरील उपाय आवश्यक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा Marathi Jokes उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. Marathi Jokes कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.