लग्नाला 40 वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिने त्याला विचारल “तुला माझ्याबद्धल काय वाटत”..? तो बावचळा, गोंदळला आता अश्या प्रश्नांची सवय नव्हती ना. प्रेम नव्ह नव्ह होत तेव्हा ठीक होत ना.हा प्रश्न तिच्याकडून दिवसातून खूप वेळा यायचा आणि त्याच्याकडे पण खूप भारी भारी उत्तरे होती.लग्न झालं,संसार नावाची प्रश्न पत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा खूप विस्मरणात गेली. आणि काल परवा हा अचानक गुगली पडला. त्यातून तिने प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती. हातात लाटणं,समोर तापलेला तवा त्याने संभाव्य धोका ओळखला आणि सांगण्यासारखं खूप आहे संध्याकाळी सांगतो अस म्हणून तो कामावर सटकला.
तो घरातून बाहेर पडला खरा पण घर काही डोक्यातून बाहेर पडल नव्हतं..आखा दिवस शब्दांची जुळवा जुळव करत गेला. कठीण असत हो! नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणे खूप कठीण होत. तो विचार करत होता. काय सांगावे?…मी राजा तू माझी राणी वैगेरे, काही म्हणावं का…पण नको. फार फिल्मी वाटत. तू खूप छान आहेस अस म्हणावं…नकोच! तिला ते फारच वेगळं वाटण्याची शक्यता आहे. त्याला काहीच सुचेना..बायकोला आवडेल अस वागणं आणि तिला पटेल अस बोलणं हे दोन्ही शिकवणारे क्लास असायला हवेत. लाईन लागेल नवऱ्याची…त्याच्या मनात असले भलते विचार येत होते. सूर्य मावळला! घरी जायची वेळ झाली.
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या डोळ्याची पापणी वर जाणार हे नक्की होत. त्याचा चेहरा खूप वाईट झाला होता. त्याने बेल वाजवली! अपेक्षेप्रमाणे तिने दरवाजा उघडला नाही. त्याच्या मुलाने दार उघडलं. आणि पुढच्या क्षणी कांद्याच्या भजीचा वास सुटला. मुलगा उडी मारत म्हणाला..भजी केलेत आईने पटकन हात धुवून या. तो मान डोलावून आत गेला. आणि पुढच्या क्षणी तो टेबलावर गेला. बायकोने भज्यांची प्लेट समोर ठेवली. लगेच बायकोने विचारलं काय सुचलं का? त्याने नकारात्मक पणे मान हलवली. तशी ती टाळी वाजवून पटकन म्हणाली. मला ही नाही सुचलं. तो पुन्हा गोंधळला. इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया! आणि ती बोलतच होती.
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने मला विचारल तुला तुझ्या बायको बद्धल काय वाटत.
सात दिवस विचार केला. पण मला काहीच सांगता येईना. मग भिती वाटली माझं तुझ्यावरच प्रेम आटल की काय? अपराधी वाटायला लागलं. काय करावं कळेना. मला स्वतःविषयी शंका होती. पण 35 वर्ष्यानंतर तुझं प्रेम कणभरही आटलं नाही याची मात्र खात्री म्हणून जा प्रश्न तुला विचारला. वाटलं तुला उत्तर देता आलं की आपण चुकीचं आहोत. पण नाही.. तुला ही उत्तर देता आलं नाही. म्हणजे आपण आता अश्या वळणावर आहोत जिथं फक्त वाटण सोडून वाटून घेणं सुरू झालय. आता शब्द सापडत नाहीत. आणि त्याची गरजही वाटत नाही. कारण आता एकमेकांना सिद्ध करण्याची धडपड संपली आहे. अस म्हणूम तिने कांदा भजी तिला भरवली. खरोखर सांगतो त्या 40 वर्ष्याच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता. मित्रानो नाती फक्त नावाला नसतात. ती नाती जपायला लागतात. ती नाती टिकवायला लागतात. अश्याच…नात्यानं जपत…नात्यांवर्ती प्रेम करत…करा असे काही काम झक्कास..प्रत्येकाला वाटेल व्हावं तुमच्यासारखा खास…..
मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा लेख कस वाटला ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.